मंगळवार, २५ जुलै, २०२३

अधिक महिना जाणुन घ्या माहिती


 अधिक मास

 अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा 32 दिवसांऐवजी 30 दिवसांशी संबंधित आहे.  चंद्र कॅलेंडर (चंद्रमान दिनदर्शिका) आणि सौर दिनदर्शिका (सौरमन दिनदर्शिका) दोन्ही हिंदू धर्मात वापरल्या जातात.

 चंद्राच्या कॅलेंडरनुसार, चंद्राची एक क्रांती सुमारे 29.5 दिवस घेते, म्हणून वर्ष म्हणून 12 चंद्रांचा विचार केला तर आपल्या कॅलेंडरमध्ये सुमारे 354 दिवस आहेत.  त्यामुळे सौर दिनदर्शिकेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो.

 हा 11-दिवसांचा फरक समतोल राखण्यासाठी, दर तिसऱ्या वर्षी, एक अतिरिक्त महिना किंवा अधिक दिवसांचा महिना जोडला जातो.  कार्तिक किंवा अश्विन महिन्यातील अमावस्या (नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस) नंतर हा अधिक मास जोडला जातो.  ही अधिककामाची उपलब्धी वर्षाच्या चंद्र महिन्याच्या आधारे निर्धारित केली जाते आणि हिंदू सण आणि धार्मिक कार्यक्रमांना सौर दिनदर्शिकेशी संरेखित करण्यात मदत करण्याचा हेतू आहे.

 काही वर्षांमध्ये, युनियन (क्षय) पूर्ण करण्यासाठी आणि चंद्र आणि सौर दिनदर्शिकेचे पुनर्कॅलिब्रेट करण्यात मदत करण्यासाठी आणखी दोन महिने देखील जोडले जाऊ शकतात.

 पंचांगात या आदिमासचा विशेष उल्लेख आहे आणि त्याच्या आधारे वैदिक धर्मातील अनेक सण, व्रत आणि उपासना योजलेल्या आहेत.

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा, इथे करा तुमचा हप्ता चेक

 या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा, इथे करा तुमचा हप्ता चेक





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात. हे पैसे चार महिन्यांच्या फरकाने प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्यात 2 हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात. पण आता राज्य सरकारनेही तसाच निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना डबल पैसे मिळणार आहेत.

 

शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेले. याचाच अर्थ प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खरंतर खूप दिलासादायक निर्णय आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं कसा अर्ज करावा लागेल? याबाबतची अधिकृत माहिती सध्यातरी राज्य सरकारडून सविस्तरपणे जारी करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक-दोन वाक्यात माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना जसे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात अगदी तसेच पैसे राज्य सरकारकडूनही त्याचवेळी मिळतील. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाचवेळी ते पैसे जमा होतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.‘या’ नागरिकांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी.

राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेतलाय. याचाच अर्थ जसे निकष केंद्राचे आहेत तसेच निकष राज्यातही असू शकतात. पीएम किसान योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. पण यामध्ये घटनात्मक पदावरील व्यक्ती उदाहरणार्थ राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, आजी-माजी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापौर, आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सनदी लेखपाल, वास्तूरचनाकार यांना वगळण्यात आलंय. तसंच राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतही या नागरिकांना वळवलं जाण्याची शक्यता आहे.योजनेचा पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
पीएम किसान योजनेचा लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांना गावच्या तलाठी कार्यालयाकडे आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स द्यावी लागली होती. त्यातून त्यांची नाव नोंदणी करण्यात आली होती. आतादेखील तशीच कागदपत्रे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात दाखल करावी लागू शकतात.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी विशेष वेबसाईट बनवली आहे. तिथे शेतकरी स्वत: अर्ज दाखल करु शकतात आणि आपल्या माहितीत बदलही करु शकतात. आता राज्य सरकारकडूनही तसं वेब पोर्टल सुरु केलं जाण्याची शक्यता आहे.

नमो किसान सन्मान योजनेसाठी ऑनलाईन नोंदी केली जाऊ शकते. त्यासाठी अधिकृत पोर्टलची माहिती देखील जारी केली जाईल. त्यानंतर शेतकरी सायबर कॅफे, महा ई सेवा केंद्र आणि इतर ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरु शकतील. अर्थात याबाबत नवी काही अपडेट आल्यास आम्ही आमच्या ‘टीव्ही 9 मराठी’ वेबसाईटवर सविस्तर माहिती देणार आहोत.

शुक्रवार, ५ मे, २०२३

2023 यंदा भरपुर पाऊस ! काळजी नसावी !! पंजाबराव डख

 2023 यंदा भरपुर पाऊस ! काळजी नसावी !! पंजाबराव डख


देशात अल निनोचा प्रभावामुळे पाऊस कमी पडेल असे भाकीत अमेरिकन हवामान विभाग तसेच स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवल्यानंतर तसाच अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये विशेष मध्य भारतातील गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान पावसाचे खूप कमी असेल असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार शेतीचे पुढील नियोजन करत असतात. स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या कमी पाऊस पडनार असं जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तेव्हा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका असा दिलासा देत यंदा भरपुर पाऊस पडेल असे सांगितले आहे.अलनिनोचा पावसावर फारसा परिणाम होत नाही, आणि मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर पाऊस होईल असा दावा त्यांनी केलाय.तर यंदा महाराष्ट्रात मान्सून चे आगमन हे 08 जुन ला होईल व 22 जुनपर्यत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल व 27,28 जुनपासून पेरणीला सूरुवात होईल.असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार यंदा जुनपेक्षा जूलै, ऑगस्ट, सप्टेंबर,ऑक्टोबर या महिन्यात जास्त पाऊस पडेल.आणी महाराष्ट्रातील लहान मोठी धरणे तुडुंब भरतील असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. पुढे 26 ऑक्टोबर ला थंडीला सुरुवात होईल. असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

बुधवार, ३ मे, २०२३

‘या’ पिकाची शेती करा आणि कमवा 10 ते 12 लाख रुपये

 शेतकऱ्यांनो .. ‘या’ पिकाची शेती करा आणि कमवा 10 ते 12 लाख रुपये


ग्रीन चिली फार्मिंग व्यवसाय यात तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या हा व्यवसाय खूप ट्रेंडमध्ये आहे. मिरचीची लागवड केल्याने तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. कारण मिरची डिशमध्ये चव आणण्याचे काम करते. म्हणजेच मिरचीशिवाय सर्व पदार्थ निरुपयोगी आहेत.
मिरची लागवडीचा खर्च जाणून घ्या
दुसरीकडे जर आपण 1 हेक्टर शेतीबद्दल बोललो तर आपल्याला 7 ते 8 किलो मिरचीची आवश्यकता असेल. ज्याची किंमत 20 ते 25 हजार रुपये असू शकते. संकरित बियाणे पेरल्यास 35 ते 40 हजार रुपये खर्च करावे लागतील.

मगधीरा बीचसाठी 40 हजार रुपये आकारले जातील. यासोबतच शेताची नांगरणी, खते, सिंचन, औषधे, मार्केटिंग आदी कामे करावी लागणार आहेत. यानुसार 1 हेक्टरमध्ये एकूण अडीच लाख ते 3 लाख रुपये खर्च येतो.

नफा किती होईल
मगधीरा दरम्यान पेरणी केल्यास 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळू शकते. बाजारात मिरचीचा दर 30 ते 80 रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत समजा तुम्ही 50 रुपये किलोने मिरची विकली तर 300 क्विंटल मिरचीची किंमत 15 लाख रुपये असेल. म्हणजे 1 हेक्टरमध्ये सुमारे 12 लाख रुपयांचा नफा होईल. त्याचे फायदे पाहून तुम्ही एकदा ट्राय करू शकता.
शेती कशी करावी
माहितीसाठी मिरचीची लागवड बेड तयार करून केली जाते. वर्षाच्या कोणत्याही हंगामात लागवड करता येते. पण हंगामानुसार मिरचीचे प्रकार आहेत आणि त्यांची काळजी घेण्याच्या पद्धतीही आहेत. चांगल्या पिकासाठी संकरित बियाणे निवडावे.

जर तुम्हाला स्वतः रोपवाटिका लावायची नसेल तर रोपवाटिकेतून रोपे खरेदी करा. त्याची झाडे 2-2 फूट अंतरावर असावीत. त्याचे अंतर 2 ते 3 फूट ठेवावे. जेणेकरून हवा सतत फिरत राहते. संकरित बियाणे 60 ते 70 दिवसांत तयार होते आणि त्याचे पीक 9 ते 10 महिन्यांत तयार होते. पिकाचे उत्पादन कमी होणार नाही याची काळजी रोजच घ्यावी. मिरची हिरवी तसेच वाळलेली विकली जाऊ शकते.


रविवार, १६ एप्रिल, २०२३

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एकत्रित)

प्रधानमंञी जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य या पुढे एकञीत पणे राबविणार.......

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत निवडक आजारांवर शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांच्या जाळयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. ही योजना पूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती व दि.2 जुलै,2012 पासून आठ जिल्हयांत लागू करण्यात आली होती. त्यांनतर दि.21 नोव्हेंबर,2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरीत 28 जिल्हयांमध्ये विस्तारीत करण्यात आली होती. दि. 14 डिसेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या नावात ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अशी अंशत: बदल करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून दि.23 सप्टेंबर,2018 पासून राज्यात लागू करण्यात आली. सदर योजना राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरु करण्यात आली. ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना,2011 च्या यादीतील (SECC database) 83.63 लक्ष कुटुंबे या योजनेची लाभार्थी आहेत. दि.1.04.2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत एकत्रित योजनेतील गट-अ लाभार्थी कुटुंबांना 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.5 लक्ष रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जात आहे. गट-अ लाभार्थी कुटुंबांच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष रु.797/- विमा रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये विमा कंपनीस अदा करीत आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील गट-ब व गट-क लाभार्थ्यांना हमी तत्त्वावर उपचार पुरवित आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचारांकरिता रु.1.5 लक्षापुढील ते रु.5 लक्ष रकमेपर्यंतचे व केवळ सदर योजनेत अंतर्भूत असलेल्या 213 उपचारांकरिता रु.5 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटी हमी तत्त्वावर पुरवित आहे. कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि.23 मे, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी हमी तत्त्वावर विस्तारीत करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी सदर योजनेस मुदतवाढ दिली होती तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सूचनेनुसार दि.06.06.2022 पासून सदर विस्तारीत योजना स्थगित करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपुर्णत: निधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्य शासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आली आहे.

आधिक माहिती साठी  संकेत  स्थळाला भेट द्दा.


 

रविवार, ९ एप्रिल, २०२३

रेशन मिळाले का ? मग मेसेज पण आला का पहा

 कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर पाॅस मशीन ला लिंक करणार


रेशन दुकानातील धान्याचा वितरण व्यवस्थेतील सर्वाधिक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर पाॅस मशीन ला लिंक करणार आहेत.
यामध्ये संबंधित रेशनकार्ड धारकांना किती धान्य मिळाले याचा धान्य खरेदी केली की लगेच मोबाईल वर मॅसेज येणार आहे.
ग्राहकांना जो मेसेज पोहोचला तोच मेसेज त्या च सेकंदाला जिल्ह्यातील वितरण प्रणाली ला नोंदविला जाणार आहे.
त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होईल.
पुरवठा विभाग आधार सिडीग सह मोबाईल नंबर जोडण्याचे काम करणार आहे.




बुधवार, २९ मार्च, २०२३

नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी जन कल्याणाच्या योजना

 नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्याच्या योजना

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण महामंडाळातर्गंत नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार यांना आरोग्य साठी विवीध योजना आहेत.
नोंदणी साठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे आँनलाईन पदध्तीने करणे आवश्क आहे.

*आँनलाईन  नोंदणी आवश्य़क कागदपञे*

*ओळख पुराव्यासाठी आधार,पारपञ,वाहनचालक परवाना,रेशन कार्डे यापेैकी एक
*रहिवाशी पुराव्यासाठी आधार कार्डे,पारपञ,वाहनचालक परवाना, रेशन कार्ड मागील महिन्याचे वीज बील.
*वयासाठी आधार कार्ड,वाहनचालक परवाना,पँन कार्ड,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपञ,यापैकी एक
*स्वयंघोषणा पञ
*आधार संंमतीपञ
*मागील वर्षात ९० किंवा आधिक  दिवस काम केल्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रमाणपञ 
* बँक पास बुकची छांयाकित प्रत


*****आरोग्यच्या योजना****

*नोंदणीकृत लाभार्थी स्ञी व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ रुपये व शस्ञक्रियेव्दारे प्रसुतीसाठी २० रुपये इतकी मदत मिळते.
*नोंदणी कृत कामगांराच्या कुंटुबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख रु इतके वैद्दकीय सहाय्य मिळते.
*एक मुलीच्या जन्मानंतर कुंटुब शस्ञक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव योजना
*नोंदणी कृत बांधकाम कामगांरास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये इतके आर्थीक मदत.
*व्यसनमुक्ती केंद्रा मार्फत उपचाराकरिता ६००० रु अर्थसहाय्य.
आधिक माहिती साठी व नोंदणी करणे नुतीकरण करणे या साठी खालील संकेत स्थळा ला भेट द्दा





सोमवार, २७ मार्च, २०२३

जाॅब कार्ड धारक मजुरांच्या रोजगारात 26 रु ची वाढ

नरेगा अंतर्गत मजुरी तर 26रु ची वाढ....... 

केंद्र शासनाच्या नरेगा या योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक मजुरांसाठी सध्याच्या मजुरी मध्ये 26 रुपये इतकी घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या 23- 24 च्या या वर्षासाठी रोजगार हमी योजनेसाठी एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार सदरील वाढ करण्यात आलेले आहे ही वाढ एक एप्रिल 2023 पासून लागू होईल
ग्रामीण भागात उपजीविकेची सुरक्षा वाढविण्यासाठी
आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसाचा रोजगार देणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे अकुशल योजनेसाठी स्व: इच्छेन पुढे येऊन काम करणाऱ्या प्रोढ व्यक्तीसाठी योजना आहे
कर्नाटक गोवा मेघालय व मणिपूर या राज्यांनी सदरील मजुरी मध्ये वाढ केलेली आहे






सोमवार, २० मार्च, २०२३

गुणवत्ता पूर्व शिक्षणासाठी मिळणार मोफत टॅब

राज्य सरकारच्या महाज्योती योजनेमार्फत मिळणार मोफत‌ टॅब व 6जीबी इंटरनेट








महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती जमाती-विमुक्त जमाती तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023 करिता पुर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेसाठी पात्रता

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
उमेदवार हा  इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक असावा
उमेदवार हा नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा
जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील
विद्यार्थी हा विज्ञान शाखेचा असावा



शनिवार, १८ मार्च, २०२३

अस्मानी संकट वाली कोण?

 अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मिळणार?????


सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, भरपूर प्रमाणात रब्बी हंगामातील पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न चालू असताना हे अस्मानी संकट शेतकऱ्या समोर उभे राहिले आहे.
गहू, ज्वारी, उन्हाळ्यातील बाजरी,मका, इ.पिकाचे तर इतके नुकसान झाले आहे की,त्याचे काढणी कश्याप्रकारे करावी  किंवा आहे तशीच नांगरट करावी याची चिंता शेतकरी वर्गाला आहे.
त्याचबरोबर भाजीपाला, फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांची तर पुरती वाट लागली आहे. आंबा,चिकु,लिंबोणी, पपई, केळी, इ. फळबाग व टरबूज, खरबूज, भाजीपाला मध्ये मिरची,कारले, दोडका, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर इ. भाजीपाला पिकांचे नुकसान तर शब्दात व्यक्त करण्यात येणार नाही.
तरी या अस्मानी संकटावर सरकार काय निर्णय घेणार, पंचनामे करून मदत कधी पर्यंत मिळणार हे शेतकरी वर्गाला न सुटणारे कोडे आहे.........

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

रोजगार हमी योजनेतुन गायगोठा पाहिजे असेल तर ही बातमी वाचा ....

 शरद पवार ग्राम समृध्दी योजना या पुढे राज्य योजना म्हणुन राबविणे बाबत 

                    राज्य सरकारची मोठी घोषणा 



माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन गाय व म्हेैस या साठी पक्का गोठा बांंधण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या  त्या नुसार गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावराचे टँगीग करणे आवश्क होते .परंतु या संदर्भात स्वखर्चाने घेतलेल्या जनावरानां टँगीग करणे शेतकरी वर्गांना ञास दायक होते त्या मुळे शासनाने आज खालील प्रमाणे शुद्धिपञक काढुन नविन निर्णय घेतला आहे.


संबंधित गावचे ग्रामसेवक/ तांञिक सहाय्यक/ ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन लाभार्थीं यांच्या कडे असणांऱ्या जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी.पंचनामा करताना ग्रामसेवक , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असणे आवश्क आहे .

सदरील शासन आदेश क्र.202303171306132616
आधिक माहिती साठी शासन निर्णय पहा

गुरुवार, १६ मार्च, २०२३

रेशन एवेजी या पुढे खात्यात पैसे

 एपीएल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना धान्याएवेजी पैसे देणार

राज्यातील एपीएल कार्ड धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने २८फेब्रुवारी घेतला असून या निर्णयाच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानदाराकडे अर्ज करावा लागणार आहे त्याचा नमुना देखील स्वस्त धान्य दुकानातच पुरवठा विभागाकडून लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक यांना यापुढे या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने 31 मे 2012 आणि १ सप्टेंबर 2022 रोजी च्या पत्राद्वारे कळवले आहे.
या अर्जासोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पेजची व बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करावी.





बुधवार, १५ मार्च, २०२३

राज्यातील ई-श्रम वर नोंदणी असणाऱ्या कामगारांना दोन लाखांचा अपघात विमा

 असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना


केंद्र शासनाच्या वतीने असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने विविध प्रकारच्या योजना सूरू केल्या आहेत त्यामध्ये कामगारांच्या उन्नती साठी शासन विविध योजना राबवित असते त्यामध्ये मलांचे शिक्षण, कुटूंबातील सदस्यांचे आरोग्य किंवा इतर योजना राबविल्या जातात आहेत.


सदरील योजनेचा लाभ ई -श्रम वर नोंदणी असणाऱ्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे.

या योजनेत कामगारांना काम करत असताना अपघाती मृत्यू झाला अथवा अपंगत्व आल्यास त्यांना दोन लाख रुपये शासन देणार आहे.
अधिक माहिती साठी ई-श्रम वेबसाईट वर भेट करा


मंगळवार, १४ मार्च, २०२३

राष्ट्रीय निवृतीवेतन प्रणाली व जुनी निवृती वेतन प्रणाली यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन

जुने निवृती वेतन  व नवीन निवृती वेतन प्रणाली चा शासन निर्णय.

राज्य शासनाच्या सेवेत दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ रोजी  किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी NPS प्रणाली लागु करण्यात आली आहे. परंतु पुर्वीची परिभाषित अंशदान निवृती वेतन योजना DCPS या दोंन्ही योजनांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
१. श्री सुबोध कुमार , भा.प्र.से. (सेवानिवृत)
२.श्री.के.पी.बक्षी ,भा.प्र.से.(सेवानिवृत)
३. श्री. सुधीरकुमार श्रीवास्तव , भा.प्र.से. (सेवानिवृत)
४.समितीचे सचिव - संचालक,लेखा व कोषागारे
या प्रमाणे समिती असेल व ही समिती पुढील ३ महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करेल.
आधिक माहिती खालील शासन निर्णय पहा.



प्रमाणित बियाणे उत्पादन केंद्राची स्थापना करणे साठी शासनाने मान्यता दिली आहे.

 भुईमुग,करडई,व सुर्यफुल बियाणे उत्पादन केंद्र  तयार करणे

Groundnut seed

Groundnut plant

राष्ट्रीय कृषी  विकास योजनेंतर्गत  भुईमुग,करडई,व सुर्यफुल पैदासकार व प्रमाणित बियाणे उत्पादन  केंद्राची स्थापना करणे या प्रकल्पास सन २०२१-२२ ते २०२३-२४ या वर्षासाठी एकुण रक्कम १८१.०० लाख रुपयास मान्यता देण्यात आली आहे.


सदरील राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत भुईमूग करडई सूर्यफूल पैदासकार व प्रमाणित बियाणे उत्पादन केंद्राची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे करण्यात येणार आहे.



राष्ट्रीय कृषी विकास योजने साठी ११.३४ कोटी चा निधी मंजुर

 अनुसुचित जाती प्रवर्गकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन ११.३५ कोटी चा निधी वितरीत....

सन २०२२-२३ या सालासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता केंद्र च्या हिश्शयाचा रु ६.८० रु व राज्य हिश्शयाचा ४.५४ रु. एकुण ११.३४ कोटी चा निधी आयुक्त कृषी यांना वितरीत करण्यासाठी शासनाच्या विचाराधीन होता त्या मुळे शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना - कँफेटेरिया ही योजना केंद्र व राज्या शासनाच्या अनुक्रमे ६० .४० प्रमाणात अर्थसहाय्याने राबविण्यात येते,या योजनेतील सन २२-२३ मध्ये प्राप्त पहिल्या हप्त्यात अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता एकुण ११.३४ कोटी रुपायाचा निधी वितरीत करण्यास मुंजरी देण्यात आली आहे. सदर निधी च्या खर्चाची अंमलबजावणी  पीएफएमएस व्दारे करण्यात येणार आहे.


हा निधी केवळ अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता वितरीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वैयक्तिक लाभाच्या प्रकल्पांतर्गत सर्व विभागांनी आधार संलग्न बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाव्दारे अनुदान वितरीत करावे 
असे या शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.
आधिक माहिती साठी शासन निर्णय पहा.
 


सोमवार, १३ मार्च, २०२३

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिधापञिका असणाऱ्यानां मिळणार १००रुपयात आनंदाचा शिधा

 आनंदाचा शिधा 

गुढीपाढवा व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभाग ने मंञिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १ कोटी ६३ लाख शिधा पञिका धारकांना फक्त १०० रु  त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.
यापुर्वी हा शिधा दिवाळी सणासाठी वाटप करण्यात आला होता. या मध्ये १ किलो रवा १ किलो चनादाळ १ किलो साखर आणि १लिटर पामतेल अश्या प्रकारे हा शिधा पुढील १ महिन्यांच्या कालावधीसाठी ई पाँस मशीन द्वारे १००रुपायात प्रतिसंच या प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.

रविवार, १२ मार्च, २०२३

गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे निकाली काढुन निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय वाचा

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक ०७-०४-२०२२ पासुन करणे गरजेचे होते परंतु काही प्रशासकीय कारणासाठी ही योजना   दिनांक १० मार्च २०२३  चा पासुन सुरु करण्यासाठी चा  शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने मागणी केल्यानुसार सन २०२२-२३ सालासाठी च्या अर्थसंकल्पात २९.५० कोटी ची तरतुद करण्यात आली असुन दि.०७-०४-२०२२ ते २२-०८-२०२२ या १३८ दिवासाच्या कालवधीतील पहिल्या टप्पायातील १५०८ पाञ  दावे निकाली काढुन निधी वितरीत करण्याबाबतचा शासन  निर्णय झाला आहे 
शासन निर्णय वाचा...


महाराष्ट्र गीत

राज्यगीत

 जय जय महाराष्ट् माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा 


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभु राजा

दरी दरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा


काळ्या छातीवरती कोरली,अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती,खेळ जीव घेणी 

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

देश गौरवासाठी झिजला


दिल्लीचे ही तख्त राखितो,महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा 


अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...