अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मिळणार?????
गहू, ज्वारी, उन्हाळ्यातील बाजरी,मका, इ.पिकाचे तर इतके नुकसान झाले आहे की,त्याचे काढणी कश्याप्रकारे करावी किंवा आहे तशीच नांगरट करावी याची चिंता शेतकरी वर्गाला आहे.
त्याचबरोबर भाजीपाला, फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांची तर पुरती वाट लागली आहे. आंबा,चिकु,लिंबोणी, पपई, केळी, इ. फळबाग व टरबूज, खरबूज, भाजीपाला मध्ये मिरची,कारले, दोडका, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर इ. भाजीपाला पिकांचे नुकसान तर शब्दात व्यक्त करण्यात येणार नाही.
तरी या अस्मानी संकटावर सरकार काय निर्णय घेणार, पंचनामे करून मदत कधी पर्यंत मिळणार हे शेतकरी वर्गाला न सुटणारे कोडे आहे.........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा